मित्रांनो शालार्थ काय आहे हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये ज्यांनी हे नाव नव्याने ऐकले आहे त्यांच्या मनामध्ये कदाचित पडला असेल आणि हा प्रश्न पडणे सहाजीकच आहे. कारण शालार्थ हे नाव आपण पहिल्यांदाच ऐकत असाल.
मित्रांनो देशाचा विकास आणि प्रभुत्व हे त्या देशातील तरूणाईवर अवलंबून असते आणि देशातील तरूणाईला घडविण्याचे काम हे शिक्षणक्षेत्रात काम करणारे शिक्षक हेच अशा तरूणाईला देशाची धुरा आपल्या मानेवर झेलण्यासाठी तयार करत असतात. मित्रांनो आधि पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण यांनाही तितकीच लागू पडत असते कारण अत्तापर्यंत शिक्षकांना कधीही वेळेवर पगार होत नव्हता याचा परिणाम नक्कीच कुठेतरी त्यांच्या अध्यापन कार्यावर होताना आपल्याला दिसून येतो म्हणूनच की काय अत्तापर्यंत शासनाने इतके पैसे खर्च करूणही आपला महाराष्ट्राची प्रगती देशातील इतर राज्यांच्या तुलनेने मागे पडलेली दिसून येते. याचे कारण शासनाने शोधून शिक्षकांचे पगार महिन्याच्या 1 तारखेला होतील असा निर्णय घेण्यात आला आणि त्यातून एक नविन प्रणाली शासनाने टी.सी.एस. मार्फत आणली या प्रणालीचे नाव आहे "शालार्थ वेतन प्रणाली".
ही वेतन प्रणाली अगदी कागद विरहीत असून संगणाकावरती आपल्याला कोणत्याही वर्षाचे Reports ही आपणास पाहता येणार आहेत. महाराष्ट्रातील चार जिल्हयांतील यशस्वी वाटचालीनंतर ही प्रणाली संपूण महाराष्ट्रभर लागू करण्यात आली आहे.
या प्रणाली विषयी आपणास अधिक माहीती व्हावी या द्रष्टीने बनिवीलेला हा ब्लॉग निश्चीतच आपणास उपयोगी पडेल ही अपेक्षा.
शालार्थ बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सहाय्यक शिक्षक
जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथ.शाळा तावशी
पंचायत समिती लाखांदूर जिल्हा परिषद भंडारा मो.7588191875, 8308757444